माझे जिवन : सहावा दिवस
आज एका ठिकाणी अवाढव्य पिंपळ वृक्षाला तोडताना बघून खूप वाईट वाटलं . मनात विचारही आला की यांना थांबवावं मात्र काही गोष्टी पुढे स्वतःच शहाणपण चालत नाही . दिवसेंदिवस वृक्षतोड झपाट्याने वाढत आहे याची कुठेतरी मनाला खंत वाटते . वृक्षतोडीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे मात्र वृक्ष लावण्याच प्रमाण खूप नगण्य आहे . जागतिक पर्यावरणाच्या दिवशी मी पर्यावरणावरती एक लेख लिहिलेला आहे . सर्वांना पर्यावरणाविषयी जिव्हाळा निर्माण व्हावा व अनावश्यक वृक्षतोडीस वेळीच आळा बसावा म्हणून खाली पोस्ट करत आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे या संत तुकोबांच्या रचनेतून आपल्याला वृक्षांच महत्त्व कळून येतं , मात्र खरंच आपण वृक्षांविषयी पर्यावरणाविषयी एवढे जागरूक आहोत का हा एक यक्षप्रश्न आहे , दिवसेंदिवस झाडांची चाललेली कत्तल बघून व पर्यावरण असंतुलन बघून मन विचलित होते . जर हीच परिस्थिती अशीच कायम असेल तर पृथ्वीला सजीव विरहित व्हायला वेळ लागणार नाही . वाढत्या जागतिकीकरणाच्या नावाखाली मानवाने पर्यावरणाचा अगदी गदारोळ केलाय , वाढती लोकसंख्या , वाढते प्रदू...