पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझे जिवन : नववा दिवस

इमेज
आज सकाळी लवकर उठून योगासन केली. व शेतातून घरी जायला निघालो .. तसेही मी माझा जास्तीत जास्त वेळ शेतामध्येच निसर्गाच्या सानिध्यात घालवतो . जेवढे हिरव्यागार झाडांच्या अवतीभोवती माझे मन रमते तेवढा रस मला सिमेंट काँक्रीटच्या जंगलात अजिबात नाही . आयुष्यात कितीही यशाची शिखर पादांकृत केली तरीही निसर्ग सानिध्यात राहण्याची पक्की गाठ मनाशी बांधलीय मी        खूप दिवसांपासून सिल्लोड येथील सेतू चालक व ॲडव्होकेट युवराज तायडे यांचं मला बोलावन होत मात्र काही कारण मीमांसेमुळे भेट होऊ शकली नाही आणि आज अनावधानाने तालुक्याच्या गावाला माझं महत्त्वाचं काम निघालं माझ्या कामातून वेळ काढून मी त्यांची भेट घेण्याच ठरवलं .  त्यांनी त्यांची वेळ देऊन मला बोलावन केलं व त्यांच्या काही मित्र परिवाराला बोलावून सर्वांना माझी ओळख करून दिली. व सर्वसमावेक्ष मला भारताची राज्यघटना म्हणजेच संविधान भेट म्हणून दिले . हा अनुभव माझ्यासाठी खूप अस्मरणीय होता . राज्यघटनेचे बऱ्यापैकी वाचन मी या अगोदरही केले आहे . संपूर्ण राज्यघटना लक्षात ठेवणे एवढं सोपही नव्हे त्यासाठी काही खास स्वतःचा वेळ द्यावा ला...

माझे जिवन : आठवा दिवस

इमेज
आज सकाळीच गावात निघालो गावात चोहीकडे धीर गंभीर वातावरण होत. थोड्याच वेळात कळलं की गावातील रावसाहेब मतलबे यांच्या आईची प्राणज्योत मालवली म्हणून. जेव्हा ही घटना मला कळली तेव्हा क्षणात अवसान गळाल . दोन दिवसा अगोदरच या आजी मला भेटल्या होत्या त्यांना गुडघेदुखीचा त्रास होता बहुतेक त्याविषयी त्या माझ्याशी बोलत होत्या . आणि आज अचानक त्यांच्याविषयी असल भाष्य ऐकून थोडं मन गहिवरलं .                                                                       मन गहिवरणारच साधारणपणे आपल्या घरातील पाळीव  मांजर जरी कायमस्वरूपी हरवले तरी मणाला खुप वेदना होतात इथे तर दररोज डोळ्यासमोर दिसणारा कूणीतरी व्यक्ती कायमस्वरूपी हे जग सोडून जातोय म्हंटल्यावर कुठेतरी हृदय उसवणारच.  यात भर म्हणूनp की काय गावात या दोन-तीन दिवसांमध्ये दोन-तीन व्यक्तींची प्राण ज्योत मालवली. या मनुष्य देहाचे कोणत्या क्षणाला काय होईल काही सांगता...

माझे जिवन : सातवा दिवस

इमेज
आज घाई गडबडीतच वाचनालयाकडे निघालो होतो , तितक्यात कानावर निवृत्ती मगर यांची हाक ऐकू आली..... आवाजाच्या दिशेने जाऊन त्यांची भेट घेतली ते व त्यांचे सर्व मित्र गावातील चहा कट्ट्यावर बसले होते त्यांनी मलाही चहासाठी आग्रह केला मात्र माझ्या सवयीप्रमाणे मी चहा मध्ये अतिशयोक्ती टाळतो .... त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना दोस्ताना या विषयावर ब्लॉग वाचायला आवडेल असं त्यांनी सांगितलं म्हणून आज खास मैत्रीवर लिहाव म्हणलं.... मैत्रीमध्ये सर्वात यक्षप्रश्न म्हणजे खरा मित्र कोण , हल्लीच्या काळात खरा मित्र शोधणे म्हणजे कोहिनूर शोधण्यासारखं आहे ..... कारण प्रत्येकाला तुमच्यासोबत मैत्री करून तुमच्याकडून फायदा हवा असतो ..... फायदा तिथे मैत्री हे आता समीकरणच झालेलं आहे . अजूनही काही खऱ्या मित्रत्वाची जाण असलेले व्यक्ती या जगात आहेत मात्र ते बोटावर मोजन्या इतके शिल्लक आहेत.  प्रत्येक जण मैत्री करताना मला समोरच्या व्यक्तीकडून काय फायदा होईल किंवा मी या व्यक्तीकडून स्वतःचा काय फायदा करून घेऊ शकतो हा विचार अगोदर स्वमनावर रुजवतात . व त्यानुसार मैत्री वाढवतात विनाकारण स्तुती करतात खोटी काळजी घेतात...