पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रस्थापितांच्या शोकाला जेव्हा सत्तेचे डोहाळे लागतात

इमेज
✍️थे ऋषिकेश सुरेश आहेरच्या लेखणीतून अजित दादांच्या निधनाला दोन-तीन दिवसही उलटले नाहीत, तोच पवार कुटुंब आणि राजकीय वर्तुळात सत्तेचे पडघम वाजले, याचे नवल वाटते. शरद पवारांनी नेहमीप्रमाणे आपले दौरे सुरू केले आहेत. सामान्य माणूस आणि या राजकीय वर्गातील हा फरक आज प्रकर्षाने जाणवला. एखाद्या सामान्य कुटुंबातील व्यक्ती जग सोडून गेली, तर त्याचे नातेवाईक किमान १०-१२ दिवस तरी दुखवटा पाळतात, अनेक गोष्टी वर्ज करतात. पण दुसरीकडे समाजात असाही एक वर्ग आहे, जो मागील क्षणी घडलेली दुःखद घटना विसरून पुढच्या क्षणी सत्तेच्या गणितात मग्न होतो. यात चूक-बरोबर ठरवण्यापेक्षा, 'माणुसकी' आणि 'प्राणी' यांच्यातील पुसट होत चाललेली ही रेषाच अधोरेखित होते. ज्या दिवशी समाज माध्यमांवर अजित दादांच्या निधनाची बातमी धडकली, तेव्हा महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी अश्रू ढाळले. मात्र, तेच लोक पुढच्या क्षणी सांत्वन बाजूला सारून 'आता उपमुख्यमंत्री कोण होणार?' या चर्चेत रंगून गेले. माणसाचा मृत्यू इतका स्वस्त झाला आहे का? 'सत्तेपुढे शहाणपण चालत नाही' हे ऐकून होतो, पण आता 'सत्तेपुढे शोक आ...