🎖️ भारतीय जवान चंदू चव्हाण ?🎖️
✍️ थेट ऋषिकेश सुरेश आहेरचा लेखणीतून साभार 🎖️ भारतीय जवान चंदू चव्हाण ? 🎖️ चुकून भारतीय सीमा पार करून पाकिस्तानात गेल्यामुळे सैनिक चंदू चव्हाण यांना पाकिस्तानात अत्यंत हाल अपेष्टा सोसून परत आल्यानंतर भारतातही वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जाव लागल. सैन्याबाबत असलेल्या भारतीय कलमानुसार चंदू चव्हाण यांना नोकरी वरून देखील माघार घ्यावी लागली. मात्र इथे प्रश्न पडतो? अनावधानाने पाकिस्तान मध्ये शिरल्यामुळे जवान चंदू चव्हाण यांना एवढा त्रास सहन करावा लागतो व दुसरीकडे सीमा हैदर सारख्या व्यक्तीला एवढ्या सन्मानाने भारतीय नागरिकत्व बहाल केल्या जाते, यावरून नक्कीच वाटतेय की प्रशासनाचे रक्त गोठलय का? आयुष्याची 11 वर्ष सैन्य दलात सेवा देऊन चंदू चव्हाण यांनी चूक केलीय का ? या औरस प्रश्नांना कुठेतरी उभारी मिळाली पाहिजे तर खऱ्या अर्थाने न्यायव्यवस्थेची स्वतंत्रता दिसून येईल. आज चंदू चव्हाण यांना पेन्शनसाठी न्यायासाठी कुटुंबासाठी मंत्रालयासमोर न्यायाची भीक मागवी लागते यापेक्षा वाईट दिवस ते काय. ज्या सैनिकाने 11 वर्षापर्यंत तन-मन अर्पण करून भारत मातेची सेवा केली त्याच्यावर असे दिवस यावेत...