एका 'लोकमाणसाचा' निवृत्ती प्रवास व वाढदिवस
एका 'लोकमाणसाचा' निवृत्ती प्रवास व अभिष्टचिंतन सोहळा *माणसाने माणसासाठी माणसासारखे वागावे* हा विचार प्रत्यक्ष जगणारे व्यक्तिमत्व म्हणजे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे लाडके दिलीप राजाराम पाटील मगर, ज्यांना सारा परिसर *'मगर बापू'* या नावाने ओळखतो. आज, ३१ जानेवारी रोजी बापूंचा वाढदिवस आणि याच दिवशी त्यांच्या प्रदीर्घ सेवा काळाचा निरोप समारंभही आहे. एक स्वच्छ प्रतिमा, रोखठोक स्वभाव आणि जनसामान्यांच्या हृदयात असलेले अढळ स्थान सोबत घेऊन बापू आज सेवानिवृत्त होत आहेत. ३१ जानेवारी १९६८ रोजी जन्मलेल्या बापूंच्या बँकिंग सेवेचा गौरवशाली प्रवास करमाड शाखेतून सुरू झाला. त्यानंतर त्यांनी भवन, राहिमाबाद, मार्केट यार्ड सिल्लोड, अजिंठा आणि पुन्हा भवन अशा विविध शाखांमध्ये आपली सेवा दिली. कॅशियर, क्लार्क आणि शाखाधिकारी अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी केवळ आकड्यांची जुळवाजुळव केली नाही, तर माणसांची मने जोडली. बापूंच्या सेवा काळातील मोठा हिस्सा 'भवन' शाखेत व्यतीत झाला. या काळात भवनसह पिंपळगाव पेठ, तांडाबाजार, गव्हाली, तलवाडा, बोरगाव कासारी, कायगाव, निल्लोड, ...